राजगुरूनगर (रामचंद्र सोनवणे) – शिवतेज नवरात्र उत्सव मंडळाच्यावतीने विजयादशमी (दसऱ्याच्या) दिवशी करोनारुपी रावणाचे दहन करण्यात आले. गेली दोन वर्ष करोनाचे संकट आहे. त्याचा सामना करीत असताना नवरात्र सणासह साजरे होणारे सर्वच सण अत्यंत साध्या पद्धतीने साजरे होत आहेत. करोनाचे संकट कमी होत असताना व त्यावरील मर्यादा सरकारने शिथील केल्याने आता नागरिक मोठ्या भक्तिभावाने, श्रद्धेने सण साजरे करत आहेत.
रावण याला भलेही अन्याय आणि विकृतीचं प्रतिक मानले जात आहे. रावणरुपी करोना चे संकट दूर व्हावे. चांगले आरोग्य लाभावे, बळीराजाचे राज्य यावे. अशी मनोभावे प्रार्थना नागरिकांनी देवीकडे करीत रावणाचे दहन केले. राजगुरूनगर शहरात करोनाचे नियम शिथील झाल्यानंतर देवीचा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. दांडियावर बंदी होती. मात्र दसऱ्याच्या दिवशी नागरिकांनी सीमा उल्लंघन करीत एकमेकांना आरोग्यमय शुभेच्छा देत दसरा सण साजरा केला.
राजगुरूनगर शहरात जवळपास २० पेक्षा जास्त नवरात्र उत्सव मंडळे आहेत. एकंदरीत नऊ दिवस शासनाचे नियम पाळत हा सण यावर्षीही साजरा झाला. आज रावण दहनाच्या वेळी देवीच्या ठिकाणी आरतीसाठी नागरिकांनी गर्दी केली. आरती करून रावणाचे दहन करून देवीचे मोठ्या भक्ती भावात दहन करण्यात आले. राजगुरूनगर येथील शिवतेज मंडळाच्या वतीने सलग २२ वर्षे नवरात्री उत्सव साजरा केला जातो. दोन वर्षे करोनाच्या संकटामुळे साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावर्षीही करोनाचे नियम पाळत हा सण साजरा झाला.
दसऱ्याच्या दिवशी परिसरातील नागरिकांनी देवीच्या आरतीवेळी सहभाग घेतला. यावेळी प्रशांत घुमटकर, अभिजित घुमटकर, प्रदीप घुमटकर, अतिक सय्यद, नागेश माळी, राहुल कडलक, नरेंद्र गायकवाड, दत्त पवार, सागर लाखे, प्रतीक शितोळे, सौरभ पवार, संजय पांढरकर, शुभम जंगम. लक्ष्मण घुमटकर, आदित्य कहाणे, योगेश मोरे, नितीन कोळेकर, भावेश क्षीरसागर, संकेत वाघमारे, राहुल सुर्यगन, आकाश वसईकर, निखिल मंडलिक घनश्याम शितोळे, संदेश सांडभोर आदी उपस्थित होते. यावेळी रावणाचे दहन करून देवीचे भिमानदीच्या पाण्यात मोठ्या भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले.