नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2021 -22 या वर्षासाठीचा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आज ( सोमवार ) संसदेत सादर केला आहेत. अर्थसंकल्प “कधी नव्हे इतका चांगला’ असणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना देत सर्वसामान्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी त्या काय करतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी लॉकडाऊन दरम्यान सरकारनं केलेल्या कामगिरीची माहिती दिली यावेळी त्यांनी सांगितले ,’ लॉकडाऊनदरम्यान पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची सुरूवात करण्यात आली. या योजनेचा फायदा देशातील ८० कोटी लोकांना झाला. ‘
त्या पुढे म्हणाल्या, ” ८ कोटी लोकांना मोफत गॅस सिलिंडर मिळले. लॉक डाउनच्या काळात मोठ्या संख्येत लोकं आपापल्या घरात होती. मात्र आरोग्य सेवक ते शेतकरी आणि जवान कार्यरत होते. त्याचे मी आभार मानते.’