संपूर्ण देश गरिबी, बेरोजगारी यांच्याबरोबरच शैक्षणिक आणि आरोग्यविषयक सुविधांच्या अभावामुळे त्रस्त आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाचा जनतेला नेमका काय लाभ होईल, ते पहावे लागेल. अर्थसंकल्पामुळे खासगी क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल आणि बड्या भांडवलदारांना मदत होईल. त्यामुळे दलितांचे आरक्षण, महागाई, गरिबी आणि बेरोजगारी हे मुद्दे आणि समस्या आणखीच बिकट बनतील.