नवी दिल्ली – अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले की, आपल्याला इंग्लंडच्या माजी पंतप्रधान मार्गोरेट थ्रॅचर यांच्यासारखी खासगीकरणाची प्रक्रिया अवलंबवावी लागणार आहे.
अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पात सांगितले की, करोना संकटानंतर सरकार खासगीकरणाकडे पावले टाकत आहेत. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, सरकारकडून खासगीकरण करण्यात येणाऱ्या कंपन्यांच्या यादीत बीपीसीएल, एअर इंडिया, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, आयडीबीआय बॅंक, बीईएमएल, पवन हंस, नीलाचल इस्पात निगम लि. इत्यादी कंपन्या आहेत.
अर्थमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार तोट्यात चाललेल्या सरकारी कंपन्यांना वेळीच बंद करण्यासाठी सरकार खास रणनीती आखत आहे. या रणनीतीनुसारच सरकारने तोट्यात चाललेल्या सरकारी कंपन्या विकण्यास काढल्या आहेत.
या सरकारी कंपन्याचा लिलाव चालू आर्थिक वर्षात होणार असल्याचे संकेत आहे. विरोधकांनी यास विरोध करत हा अर्थसंकल्प ओएलएक्स असल्याची टीका केली आहे.