नवी दिल्ली – बॅंकांमधील ठेवी किती सुरक्षित आहेत हा सध्याच्या नागरीकांच्या चिंतेचा विषय आहे. त्या विषयाला धरून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ठेवीदारांची पाच लाख रूपयांपर्यंतची ठेव पुर्ण सुरक्षित असल्याची ग्वाही दिली आहे.
त्यांनी म्हटले आहे की एखादी बॅंक आर्थिक अडचणीत आली किंवा त्यामुळे ठेवीदारांना त्यांच्या ठेवी काढून घेण्याच्या संबंधात काही मर्यादा लागू करण्यात आल्या तर पाच लाख रूपयांपर्यंतच्या ठेवीदारांना डिपॉझिट इन्श्युरन्स योजनेचे संरक्षण देण्यात येणार असून त्यांच्या पाच लाख रूपयांपर्यंतच्या ठेवीची रक्कम खातेदारांना त्वरीत परत केली जाणार आहे.
क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन ऍक्टद्वारे पाच लाख रूपयांपर्यंतच्या वयैक्तिक ठेवी सुरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बॅंक बुडाली तरी ही ठेव परत मिळेल याची ठेवीदारांना ग्वाही देण्यात आली आहे.