पाबळकर वैतागले : 10 दिवसांपासून सेवा कोलमडली
पाबळ -पाबळ येथे गेल्या 10 दिवसांपासून बीएसएनएलसेवा कोलमडली आहे. त्यामुळे मोबाइल ग्राहकांची गैरसोय झाली आहे. बीएसएनएलने कोलमडलेली सेवा त्वरित सुरळीत करावी, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे.
पाबळ येथे बीएसएनएलचे मोठ्या प्रमाणावर ग्राहक आहेत. बीएसएनएलच्या कार्यालयातील कर्मचारी वर्षभरापूर्वी निवृत्त झालेला आहे तर त्याचा जागेवर दुसरा सहा महिन्यांत निवृत्त होणारा कर्मचारी नेमण्यात आला होता तोही कर्मचारी जानेवारी महिन्यात निवृत्त झाल्याने आता पुन्हा कर्मचारी नेमण्याची गरज आहे. पण तो दिला जात नसल्यानेही वेळ आल्याची ग्राहकांचे म्हणणे आहे. याबाबतीत खेड विभागीय अधिकारी सूर्यवंशी यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.
पाबळ येथे येत असलेल्या पर्यटकांचीही मोठी सख्या आहे.शेतकरी वर्गही मोठ्या संख्येने ग्राहक असल्याने कृषी विषयक संदेशाला पारखे झाले आहेत. अशा परिस्थितीत बीएसएनएलला मोठी स्पर्धा केली असल्याची बाब उघड आहे, अशा परिस्थितीत, आहे, त्या ग्राहकांकडे दुर्लक्ष्य केले जात असल्याने, जाणीवपूर्वक अपायकारक उपाय योजले जात असल्याची कर्मचारी वर्गात कुणकुण आहे
कृषी संदेशाला झाले पारखे
पाबळ येथे प्रसिद्ध जैन मंदिर, विज्ञान आश्रम, मस्तानी स्मृतिस्थळ यांसारख्या प्रसिद्ध असलेली स्थळे असून ही स्थळे पाहण्यासाठी पर्यटक येत असतात. पण रेंज नसल्याने त्यांना कोणाशीही संपर्क साधता येत नाही. तसेच शेतकरी वर्गही मोठ्या संख्येने असून ते कृषी विषयक संदेशाला पारखे झाले आहेत.
ग्राहकांकडे दुर्लक्ष
खासगी मोबाइल कंपन्यांच्या माध्यमातून टॉवर भाडे देत चांगला व्यवसाय चालवून बीएसएनएलला मोठी स्पर्धा केली असल्याची बाब उघड आहे. अशा परिस्थितीत कंपनी आपल्या हक्काच्या ग्राहकांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे भविष्यात हे ग्राहक बीएसएनलकडून परावृत्त होतील, अशी स्थिती निर्माण झाली आहे.