मुंबई : राज्यात काही दिवसांवर राज्यातील मुंबईसह प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुका ठेपल्या आहेत. त्याआधीच मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला गेले आहे.
राज ठाकरे यांनी शनिवारीच गुडीपाडवा मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर सडकून टीका केली होती. तर भाजपचे कौतुक केलं होतं. तेव्हापासून भाजप-मनसे युतीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आता गडकरी आणि राज ठाकरेंची भेट महत्त्वाची मानली जाते.
या आधी देखील भाजप नेत्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यावेळी देखील मनसे-भाजप युतीच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, काही मुद्द्यावर एकमत न झाल्यामुळे युतीची चर्चा फिसकटल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता युती होण्याची शक्यता अधिक बळावली आहे. शिवाय उत्तर प्रदेशची निवडणुक उरकली असून भाजपचा युतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज ठाकरे यांच्या उत्तर भारतीयांच्या विरोधामुळे युती आधी होऊ शकली नाही, असंही काहींना वाटत.