मुंबई – राज्यातील राजयकीय नाट्यासंदर्भात दररोज नवनवीन वृत्त समोर येत आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांच्याकडील आमदारांची संख्या आज मंत्री उदय सामंत दाखल झाल्यानंतर 47 वर गेल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र इकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हार न मानता आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच शिंदे गटातील आमदारांमध्ये फूट पडल्याचं वृत्त आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना घेऊन सत्ता स्थापन करायची असल्यास बंडखोर आमदारांना त्यांचा गटाचे विलीनीकरण राजकीय पक्षात करावे लागणार आहे. अन्यथा वेगळा गट कायद्यात बसत नसल्यचं समोर आलं आहे. त्यामुळे विलीनीकरण एकमेव पर्याय आहे. मात्र विलीनीकरणाच्या मुद्दावर बंडखोर आमदारांमध्ये मतभेद असल्याचं सांगण्यात येत आहे.
सर्व आमदार आपण शिवसैनिक असून शिवसेनेतच असल्याचं वारंवार सांगत आहेत. त्यामुळे या आमदारांना भाजपमध्ये विलीकरण फारसं रुचत नाहीये. एकूणच दुसऱ्या पक्षात विलीनकरण करण्यावरून 20 ते 25 आमदारांमध्ये मतभेद असून हे आमदार ‘मातोश्री’च्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे.