नवी दिल्ली – नरेंद्र मोदी सरकारच्या कॅबिनेट विस्तारापूर्वी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल झाल्याचं दिसून येत आहे. आतापर्यंत अनेत केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधीच काही मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. यात केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर आणि माहिती व प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांचा समावेश आहे.
आरोग्यमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन, माहिती व प्रसारणमंत्री रविशंकर प्रसाद, बाबुल सुप्रियो, रमेश पोखरियाल निशंक, सदानंद गौडा, देबोश्री चौधरी, संतोष गंगवार, संजय धोत्रे, रतनलाल कटारिया आणि प्रताप सारंगी या नेत्यांना राजीनामा देण्यासाठी सांगण्यात आलं आहे.
कॅबिनेट विस्तारापूर्वी थावर चंद गहलोत यांना मंत्रिमंडळातून हटवून कर्नाटकचं राज्यपाल पद देण्यात आलं. ते सामाजिक न्याय मंत्री होते. त्याशिवाय गहलोत यांच्याकडे राज्यसभा सभागृहाचं सदस्यपद आणि भाजपाच्या संसदीय मंडळाचंही पद होते.