नवी दिल्ली – दोन कोटींपर्यंतच्या कर्जांवरील चक्रवाढ व्याज म्हणजेच EMI माफ करण्याची तयारी केंद्र सरकारकडून दर्शवण्यात आली असून, यासाठी केंद्र सरकार विचार करत आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात कर्जदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दिवाळी आधी यावर अधिकृत घोषणा होऊ शकते. गृह कर्ज तसेच मोरॅटोरियमच्या काळात वेळेवर EMI भरलेल्या सगळ्याच कर्जधारकांना व्याजात सवलत मिळू शकते.
मोरॅटोरियम म्हणजे कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्याचा अधिकार. एक मार्च ते 31 ऑगस्ट या मोरॅटोरियम काळातील व्याजावरील व्याज माफ करण्याच्या योजनेवर काम सुरु असून, कदाचित हीच सवलत सर्व प्रकारच्या कर्जांवर देण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. एका प्रसिद्ध वृत्तपत्राने याबद्दल माहिती दिली आहे.
दरम्यान, चक्रवाढ व्याज माफी देताना सेक्टरनिहाय दुजाभाव केला जाणार नाही. व्यक्तीगत कर्जावर चक्रवाढ व्याज माफी द्यायची आणि गृहकर्जदाराला द्यायची नाही, हे शहाणपणाचे ठरणार नाही. दोन कोटी पर्यंत कर्ज घेणाऱ्या सर्वांनी ही व्याजमाफी दिली जाईल” असे अर्थमंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.