मुंबई – महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी बांधव कर्नाटक राज्याच्या स्थापनेचा दिवस म्हणजेच 1 नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळला जातो. कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यातील सीमाभागात मराठी बांधव 1 नोव्हेंबरला बंद पाळून कर्नाटक सरकारच्या जुलमी राजवटीचा निषेध नोंदवतात.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासून सुरु झालेला हा काळा दिवस गेली 63 वर्षे पाळला जात आहे. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशी मागणी येथील मराठी बांधव गेल्या कित्येक वर्षापासून करत आहे. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी, संतपूरसह संयुक्त महाराष्ट्र करण्यासाठी अनेक लढे झाले, अनेकांनी प्राण गमावले. परंतु हा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. यावर आज संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलतांना बेळगावात मराठी माणासांवर सुरु असलेल्या दडपशाहीविरोधात संताप व्यक्त केला आहे.
संजय राऊत म्हणाले,’बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी, संतपूरमध्ये मराठी लोकांवर जो अत्याचार होत आहे. त्यांची दाखल केंद्र सरकार घेत नाही. जर या मुद्य्यांची केंद्र सरकार दखल घेत नसेल. तर महाराष्ट्र सरकार किंवा शिवसेनेनेला जबाबदार धरु नये. डोकी फुटली तर दिल्लीला रडत जाऊ नका. अशी संतापजनक प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
ते पुढे म्हणाले,'”बेळगावातील शिवसेनेच्या तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुखांवर कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. बेळगावातील कायदा-सुव्यवस्था उद्धवस्त झाली आहे. हा एकाराजकीय पक्षाचा विषय नाही. विरोधीपक्षासह सर्वपक्षीय शिष्टमंडळ तात्काळ बेळगावला पाठवलं पाहिजे. अन्यथा हा तणाव वाढत जाईल” असे राऊत म्हणाले. “सांगली, कोल्हापुरातून लोक आतमध्ये शिरली, तर शिवसेना, महाराष्ट्र सरकाराला दोष देऊ नका” असा इशारा संजय राऊत यांनी दिला.