बोपखेलनगरी ही कबड्डीची पंढरी मानली जाते. या मातीने महाराष्ट्राला अनेक खेळाडू दिले; परंतु याच मातीत प्रतीक्षा नावाचं आगळं-वेगळं व्यक्तिमत्त्व उमलत आहे. कारण त्यांच्या नावातच उदारत्व, सक्रिय, गंभीर आणि कोणत्याही चांगल्या कार्यासाठी अनुकूल असे वैविध्यपूर्ण गुण आहेत. शिवाय महाराष्ट्र संतांची भूमी आहे. त्या संत परंपरेचे पाईक आणि वारकरी संप्रदायाशी ज्यांची नाळ जोडली आहे, अशा माता-पित्याच्या पोटी प्रतीक्षा लक्ष्मण घुले यांचा जन्म झाला. त्यामुळे भक्ती-शक्तीचा मिलाप त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतो. वडील खडकीतील ऍम्युनेशन फॅक्टरीत असताना कामगारांचे प्रश्न मांडण्यासाठी कामगार चळवळीच्या माध्यमातून सतत अग्रेसर आणि संप्रदायाची शिकवण असल्याने सतत एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ’ या संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे मदतीचा भाव त्यांच्या ठिकाणी आहे. तोच वसा युवा रणरागिणी प्रतीक्षा यांच्यात असल्याने त्या सतत समाजातील गोरगरीब, गरजू व्यक्तींच्या मदतीला धावून जातात. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन युवा सेनेच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करत असतात.
प्रतीक्षा यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनापासून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. त्यामुळे महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांच्यात नेतृत्वगुण ओतप्रोत भरला असल्याने त्यांनी नागरिकांची सेवा करण्याचा वसा हाती घेतला. पुढे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी मराठी माणसांच्या समस्या समजून घेऊन त्यांना न्याय देण्याची भूमिका स्वीकारल्यामुळे त्या अवितरपणे कार्यरत आहेत. महिलांच्या पाठीमागे त्या खंबीरपणे उभा राहतात. शहरातील कोणताही प्रश्न असो त्याला वाचा फोडण्याचे काम युवा सेनेच्या माध्यमातून त्या करीत आहेत.
कासारवाडी येथे ड्रेनेज लाइनचे काम करताना घराची भिंत कोसळून लहान मुलगा मृत्युमुखी पडला होता. त्यांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजाविली. महावितरणच्या मानमानी कारभाराला लगाम घालण्यासाठी प्रयत्न केले. ग्राहकांची महावितरणकडून होणारी लूट थांबविण्यासाठी निवेदने, आंदोलने केली. शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे, दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात देणे, सांगली, कोल्हापूरला पूर आला तेव्हा त्यांच्या मदतीसाठी धावणे, पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देणे, ज्ञानोबा-तुकोबांच्या पालखीत येणाऱ्या वारकऱ्यांना अन्नदान करणे. माणसांबरोबरच पशूपक्ष्यांविषयीदेखील त्यांच्या अंतःकरणात प्रेमभाव असल्याने चिंचवड येथून जात असताना कोकिळेचे प्रक्षीमित्रांच्या मदतीने प्राण वाचविले, शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी तत्कालीन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना निवेदन देऊन सामाजिक बांधिलकी जपली, तसेच प्रदूषणामुळे होणारा ऱ्हास थांबविण्याची मागणी केली.
गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप, अंगणवाडी मुलांसाठी गणवेश वाटप, फुगेवाडी येथील महापालिकेच्या माध्यमिक विद्यालयासाठी स्वतंत्र मुख्याध्यापक नेमण्यासाठी प्रयत्न, शहरातील कारखान्यांत 80 टक्के भूमिपुत्रांना कामाची संधी मिळावी यासाठी प्रयत्न, विशेष मुलांसाठी वस्तूंचे वाटप, आरटीओमध्ये सर्वसामान्यांची भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून होत असलेली लूट थांबविण्यासाठी प्रयत्न तसेच भ्रट अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी. देशात मुलींवर होत असलेले अत्याचार थांबविण्यासाठी बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी. वायसीएम रुग्णालयात रेबीज लस उपलब्ध करून देण्याची मागणी, शहरात सतत विस्कळीत पाणीपुरवठा होतो त्याला वाचा फोडण्याचे काम असे असंख्य प्रश्नांना त्यांनी युवा सेनेच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम केले आहे.
आजची महिला असूनही कोठेही कमी न पडता निर्भीडपणे कोणत्याही संकटला समोरे जाण्याची त्यांची तयारी असते. त्या सध्या पिंपरी-चिंचवड शिवसेना संघटिका म्हणून कार्यरत आहेत. समाजातील शोषित होतकरू महिलांसाठी काम करीत आहेत.