मुंबई – पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात काल चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये चकमक झाल्यानंतर दोन्ही देशांदरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले असतानाच काल याबाबतची मोठी माहिती समोर आली आहे. त्यात भारताचे २० जवान शहीद झाल्याची माहिती आहे. त्यांच्या या वीरमरणावर ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या सह बॉलीवूड सेलिब्रिटींनी भावनिक पोस्ट लिहिली आहे.
My heart goes out to all brave hearts who hv laid down their lives at the Galwan valley. This sacrifice will not go to waste. I join their families in grief… #JaiHind #WeStandWithIndianArmy
— Salman Khan (@BeingSalmanKhan) June 17, 2020
”गलवान खोऱ्यात आपल्या देशासाठी ज्या जवानांनी प्राणांची आहुती दिली, त्यांचं बलिदान असं व्यर्थ जाणार नाही. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. जय हिंद. आम्ही कायम भारतीय सैन्यासोबत आहोत”असं ट्विट सलमान खानने केले आहे बॉलीवूड सेलेब्समध्ये अक्षय आणि सलमान खानप्रमाणेच अमिताभ बच्चन, अनिल कपूर, सोनू सूद, विकी कौशल, हृतिक रोशन, यामी गौतम, नेहा धुपिया, रवि किशन, अदनान सामी,निमरत कौर, सोफी चौधरी, हिमांश कोहली, अशा अनेक दिग्गज कलाकारांनी शहिद जवानांना आदरांजली वाहिली आहे.