Odisha Train Accident : ओडिशातील बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी एक वेदनादायक रेल्वे अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 280 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 900 लोक जखमी आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. यातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेनंतर अनेक पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी शोक व्यक्त केला. यावर अनेक बॉलीवूड कलाकारांनी देखील शोक व्यक्त केला आहे.
अभिनेता सलमान खान याने ट्वीट करत या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले. ‘दुर्घटनाची माहिती कळाल्यानंतर खूप वाईट वाटले. जखमींना आणि पीडित कुटुंबाला या दुःखातून बाहेर येण्याची शक्ती देव देवो,’ असे ट्वीट सलमान खान केले आहे. तर सनी देओलने ट्वीट करत लिहिले की, ‘ओडिशातील बालासोर येथे झालेल्या वेदनादायक रेल्वे अपघाताबद्दल ऐकून खूप वाईट वाटले. या रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना. जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो.’
Really saddened to hear abt the accident,May God rest the souls of the deceased in peace,Protect n give strength to the families n the injured from this unfortunate accident.
— Salman Khan (@BeingSalmanKhan) June 3, 2023
RRR फेम अभिनेता ज्युनियर एनटीआरने देखील ट्वीट करत लिहिले की, ‘रेल्वे दुर्घटनेत पीडित कुटुंब आणि त्यांच्या प्रियजनांसाठी मी मनापासून प्रार्थना करतो. माझ्या प्रार्थना या घटनेत प्रभावित झालेल्या सर्व लोकांसोबत आहेत. त्यांना कठीण प्रसंगाशी लढण्याची हिंमत मिळो, अशी मी प्रार्थना करतो.’
Deeply saddened to hear about the tragic train accident in Odisha’s Balasore.
My condolences to the families of those who died in this train accident and I pray to the Almighty for the speedy recovery of the injured.#TrainAccident— Sunny Deol (@iamsunnydeol) June 3, 2023
Heartfelt condolences to the families and their loved ones affected by the tragic train accident. My thoughts are with each and every person affected by this devastating incident. May strength and support surround them during this difficult time.
— Jr NTR (@tarak9999) June 3, 2023
दरम्यान, ओडिशातील बहानगा गावाजवळ हावडा-चेन्नई कोरोमंडल एक्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरले होते. त्यानंतर अचानक या घसरलेल्या डब्यांवर समोरून येणारी मालगाडी धडकली. यातच 280 जणांचा मृत्यू झाला आणि 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी सात वाजता घडला. या घटनेनंतर मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.