नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील 20 जणांना घेऊन जाणारी बोट शरयू नदीत बुडाली आहे. दुर्घटनेत एकाचा मृतदेह हाती लागला असून तीनजण बेपत्ता आहेत. तर 10 जणांनी पोहत आपला जीव वाचवला.
बोटीतून प्रवास करणारे सर्वजण शेतकरी होते. हे सर्व आपल्या कामासाठी नदी किनारी शेतात पेरणी करण्यासाठी जात होते. यावेळी ही बोट उलटून हा अपघात घडला, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितली आहे. दरम्यान सध्या घटनास्थळी पोलीस व बचावपथक दाखल झाले असून शोध आणि बचावकार्य सुरू आहे.