मुंबई – कंगना मुंबईत येण्यापूर्वीच मुंबईतील पाली हिल परिसरात असलेल्या कंगना राणावतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेचा हातोडा पडला आहे. पालिकेने सकाळी 11 वाजताच्या सुमारास ऑफिसचे टाळे तोडून कारवाईला सुरुवात केली.
याच कारवाईवर आता कंगनानं नुकसानभरपाई म्हणून पालिकेकडे केलेली 2 कोटींची मागणी ही निराधार केला मात्र मुंबई महानगरपालिकेनं हायकोर्टात खोटी याचिका दाखल केल्याबद्दल कंगनावरच दंडात्मक कारवाईची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालिकेतर्फे एच पश्चिम वॉर्डाचे अधिकारी भाग्यवंत लोटे यांच्यावतीनं कंगनाच्या याचिकेला उत्तर देत पालिकेनं आपलं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केलं आहे. या प्रकरणी हायकोर्टात येत्या 22 सप्टेंबरला न्यायमूर्ती काथावाला यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. कंगना रानौतला मुंबई उच्च न्यायालयानं तूर्तास दिलेला दिलासा 22 सप्टेंबरपर्यंत कायम राहणार आहे.
तत्पूर्वी, कंगना हिच्या मुंबईतील बंगल्यात जे अनाधिकृत बांधकाम झाले आहे, त्या संबंधात मुंबई महापालिकेने तिला दोन वर्षांपुर्वीच नोटीस दिली आहे आणि त्याच वेळी ती या नोटीशीच्या विरोधात कोर्टातपण गेली होती अशी माहिती उपलब्ध झाली आहे. कंगनाच्या बंगल्याचे बांधकाम केवळ 24 तासांची नोटीस देऊन कसे पाडले असा प्रश्न उपस्थित केला जात होता त्या पार्श्वभूमीवर महापालिका सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली आहे.