जागोजागी कचऱ्याचे ढीग : नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात
नगर (प्रतिनिधी) – महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधत महानगरपालिका शहरात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत प्लॅस्टिक बंदीसाठी मोहीम मर्यादितच राहिली असून, शहरात ठीक-ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे पडले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात स्वच्छता अभियानाचा बोजवारा वाजला असून, पालिकेचे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसत आहे.
महानगरपालिकेकडून “स्वच्छता हीच सेवा’ ही मोहीम 1 ते 3 ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात आली. शहरातील प्लॅस्टिक संकलित करण्यासाठी महापालिका कर्मचारी व्यावसायीक, तसेच घरोघरी जाऊन प्लॅस्टिक बाबत मार्गदर्शन ही करण्यात आले. या मोहिमेत सामाजिक संस्था, बचतगट ही मोठ्या प्रमाणात सहभागी होवून स्वता: मनपा आयुक्त हे शहरात प्लॅस्टिक बंदी व स्वच्छते बाबत मार्गदर्शन केले. मात्र, ही मोहीम बंद पडली असून नगरकरांनाही विसर पडला आहे. त्यामुळे सर्वत्रच शहरात कचऱ्याचे ढिगारे पडले आहेत.
त्यावेळी शहरात महापालिका कर्मचाऱ्यांची पाच पथके तयार करून ही पथके प्रत्येक घरात जाऊन प्लॅस्टिक गोळा करून, तसेच नागरिकांना प्लॅस्टिकमुक्तीची शपथ देऊन त्यांची नोंद करणार आहेत. प्रत्येक पथकाला 50 हजार घरांना भेटी देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. तसेच शहरात खासगी मोकळे भूखंड असलेला कचरा भूखंडमालकांनी काडून घ्याण्याबाबत मनपा प्रशासन नोटीसा बजावणार होते. मात्र पुन्हा शहरात कचऱ्याचे साम्राज वाढत चालेले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे मनपा प्रशासनाने लक्ष द्याण्याची गरज व्यक्त होत आहे.