चिंबळी – खेड व हवेली तालुक्यातील श्रीक्षेत्र आळंदी व देहू या तीर्थ क्षेत्रातून वाहत असलेल्या इंद्रायणी नदीवर महाराष्ट्र शासनाने गेल्या चाळीस वर्षांपूर्वी कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधला. शेतीसाठी पाणीसाठा मुबलक झाला असल्यामुळे मोई, कुरूळी, चिंबळी, केळगाव आदि परिसरातील शेतकरी वर्ग बारा बहिने विविध प्रकारच्या पिकाचे उत्पन्न घेत असतात; परंतु यावर्षी परतीच्या मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने व ढगाळ वातावरण निर्माण झाले असल्याने या सर्वच पिकांना फटका बसला आहे.
मरकळ, सोळू, धानोरे, केळगाव, चिंबळी, कुरूळी, मोई, निघोजे, केळगाव परिसरात शेतकरी वर्गानी दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही झेंडू, ऍस्टर, गलांड्या, बिजलीसह इतर फुलांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. परंतू या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. या हवामानाचा फटका या फुल शेतीला वसल्यामुळे फुलांचे उत्पन्न घटणार असल्याने केलेला खर्च वाया जातो की काय, याची चिंता शेतकरी वर्गाला लागली आहे. त्यामुळे सोळू, धानोरे, केळगाव, चिंबळी, कुरूळी, मोई, निघोजे, केळगाव परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.