संजय राऊतांच्या भाजपला टोला
मुंबई: राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होत नसल्याने राज्यपालांनी सार्वधिक बहुमत असलेल्या भाजप ला सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले होते. त्यानंतर भाजपच्या कोर कमिटीची बैठक झाली आणि या बैठकी नंतर आम्ही सत्ता स्थापन करण्यास असमर्थ असल्याचे भाजपने जाहीर केले आहे. त्यानंतर शिवसेनेच्या गोटातून राजकीय हालचालींना वेग आलेला पाहायला मिळत आहे.
भाजपच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी रावण झाले होते. त्यानंतर “जर भाजप सरकार स्थापन करणार नाही तर मग त्यांचा मुख्यमंत्री कसा होईल” असा टोला लगावला आहे. तसेच मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचेही पुन्हा एकदा सांगितले आहे.
भाजपच्या नाकारानंतर दुसऱ्या क्रमांकावरील पक्ष असलेल्या शिवसेनेला राज्यपालांकडुन सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण पाठविण्यात येणार असल्याने शिवसेना आता काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपने सत्ता स्थापनेला नकार दिल्यानंतर शिवसेनेपुढे आघाडीचाच पर्याय उरला असल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेस अक्षय भूमिका घेतात हे महत्वाचे ठरणार आहे.