मुंबई – येत्या 16 ऑगस्टपासून महाराष्ट्रातील भाजपचे नेते सोमवारपासून महाराष्ट्रभर जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत. यामध्ये अनेक भागात नव्यानं झालेले केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या यात्रेचं नियोजन केले जात आहे.
लोकांशी संवाद साधण्यासोबतच केंद्रातील योजनांची माहिती देखील ते जनतेला देणार आहेत. भाजपच्या वतीने देशभर हा कार्यक्रम आखला गेला आहे. महाराष्ट्रासह 22 राज्यांमध्येही यात्रा निघणार आहे.
तब्बल 19 हजार 567 किमी प्रवास केंद्रीय मंत्री करणार आहे. यामध्ये आपापल्या मतदार संघात न जाता इतर जिल्ह्यात मोदींच्या मंत्रिमंडळात नव्याने समावेश झालेले नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड हे नेते महाराष्ट्रभर जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत.
भारती पवार पालघर जिल्हयातील आदिवासी भाग आणि उत्तर महाराष्ट्रात यात्रा करणार आहेत,तर मराठवाड्यात भागवत कराड आणि रावसाहेब दानवे हे जन आशीर्वाद यात्रेचे नेतृत्व करणार आहेत.
रावसाहेब दानवे यांच्याकडे जन आशीर्वाद यात्रेचे नेतृत्व
– देशभरातील 39 मंत्री जन आशीर्वाद यात्रेत सहभागी
– महाराष्ट्रासह 22 राज्यांमध्येही यात्रा निघणार
– तब्बल 19 हजार 567 किमी प्रवास केंद्रीय मंत्री करणार
– 212 लोकसभा मतदारसंघापर्यंत पोहोचण्याचा भाजप प्रयत्न
– नारायण राणे 20 ऑगस्टपासून यात्रा सुरू करणार (मुंबईसह कोकणाची जबाबदारी )
– कपिल पाटील यांच्याकडे ठाणे, नवी मुंबईची जबाबदारी