मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अन्वय नाईक परिवाराशी आर्थिक व व्यावसायिक संबंध होते, आहेत. ते का लवण्यात आले. असे म्हणत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे कुटुबांवर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, यावरुन आता यावरून राजकारण पेटले आहे. काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनीदेखील भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. रिपब्लिक चॅनेलमध्ये भाजपाची भागीदारी असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.
दिवंगत अन्वय नाईक आत्महत्येसाठी जबाबदार व्यक्तीला पाठीशी घालण्याच्या प्रयत्नात किरीट सोमय्या यांनी त्यांच्या जमीन व्यवहाराला मध्ये आणून आपली व भाजपाची हीन मानसिकता दर्शवली. रिपब्लिक चॅनेलमध्ये भाजपा खासदार राजीव चंद्रशेखर हे भागीदार होते. गोस्वामी यांचा भाजपाशी थेट संबंध आहे
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) November 13, 2020
“दिवंगत अन्वय नाईक आत्महत्येसाठी जबाबदार व्यक्तीला पाठीशी घालण्याच्या प्रयत्नात किरीट सोमय्या यांनी त्यांच्या जमीन व्यवहारामध्ये आणून आपली व भाजपाची हीन मानसिकता दर्शवली. रिपब्लिक चॅनेलमध्ये भाजपा खासदार राजीव चंद्रशेखर हे भागीदार होते. गोस्वामी यांचा भाजपाशी थेट संबंध आहे,” असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपावर निशाणा साधला.
“अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचा व जमीन व्यवहाराचा संबंध काय? मराठी कुटुंबाची वाताहत झाली त्याचे सोमय्या यांना काहीही पडलेलं नाही. फडणवीस सरकारने आत्महत्या प्रकरण दाबले कारण आरोपी भाजपा संबंधित आहे. भाजपासाठी काम करतो. भाजपा हा पक्ष महाराष्ट्र द्वेष्टा आहे हे स्पष्ट आहे,” असंही सावंत यांनी नमूद केलं.