मुंबईत वास्तव्यास असलेल्या सातारा सांगली जिल्ह्यातील डोंगरी जनतेचे प्रश्न सोडवण्याचे काम गेली 25 वर्षे सुरू आहे. माथाडी कामगार मच्छीमार व्यावसायिकांचे प्रश्नाबाबत मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांची भूमिका सकारात्मक असल्याने या लोकांचे प्रश्नांची सोडवणूक व्हावी या एकाच उद्देशाने आपण भाजपमध्ये प्रवेश करत करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पोपटशेठ पाटील यांनी दिली.
कराड – अखिल महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार संघटनेचे संस्थापक सातारा सहकारी बॅंक मुंबईचे माजी चेअरमन माथाडी कामगार नेते पोपटशेठ पाटील हे गुरुवार दिनांक 13 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत कराड दौऱ्यात आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
पोपट शेठ पाटील हे मूळचे कराड दक्षिण मतदार संघातील उंडाळे नजीकच्या जिंती या गावचे रहिवासी आहेत. लहान वयातच त्यांनी रोजगारासाठी मुंबई गाठली तेव्हापासून ते मुंबईत सहकार व कामगार क्षेत्रात कार्यरत राहिले स्वतःच्या प्रगतीबरोबर त्यांनी ग्रामीण डोंगरी भागातील लोकांची मुंबईत संघटना स्थापन केली. मुंबईत यशस्वी उद्योजक असताना त्यांनी मातीची नाळ कायम ठेवली. त्यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईत सहकार क्षेत्रातील दर्यासागर व जनसागर या दोन मोठ्या आर्थिक व्यवहार करणाऱ्या पतसंस्था कार्यरत आहेत ते मुंबईच्या सातारा सहकारी बॅंकेचे पाच वर्ष अध्यक्ष होते. स्वतःच्या नेतृत्वाखाली पॅनेल उभे करून त्यांनी या संस्थेत सत्ता हस्तगत केली होती या पाच वर्षाच्या कालावधीत त्यांनी बॅंकेची चौफेर प्रगती केली.
माथाडी चळवळीत काम करताना आपल्या नेतृत्वाखाली स्वतंत्र अखिल महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना स्थापन केली व या संघटनेच्या माध्यमातून माथाडी कामगारांचे मुंबईतील विविध प्रश्न सोडवले मुंबईत माथाडी कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी माथाडी गृहनिर्माण संस्था स्थापन करून पाचशेपेक्षा अधिक माथाडी कामगारांना मुंबईत स्वतःच्या हक्काचे घर मिळवून दिले. पोपटशेठ पाटील हे मुंबई कॉंग्रेसचे अनेक वर्ष सरचिटणीस म्हणून कार्यरत होते याशिवाय राज्य शासनाच्या मत्स्योद्योग महामंडळाचे अध्यक्ष होते या कालावधीत शासनाच्या माध्यमातून त्यांनी मच्छिमारांच्या अनेक प्रश्न सोडवले त्यांचे महाराष्ट्रातील सर्व मंत्री व मुख्यमंत्री यांचेशी घनिष्ठ संबंध होते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे ते जवळचे सहकारी होते त्यांच्या भाजपा प्रवेशाने पृथ्वीराज चव्हाण पर्यायाने कॉंग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.