शिराळा – आगामी काळात जनतेच्या हिताची व सार्वजनिक विकासाची कामे मार्गी लावण्यास कटिबध्द राहू, असे प्रतिपादन आ. मानसिंगराव नाईक यांनी केले. वाकुर्डे बुद्रूक, ता. शिराळा येथील भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपसभापती सम्राटसिंग नाईक, फत्तेसिंगराव नाईक, दूध संघाचे संचालक नामदेव पडवळ, नामदेव कांबळे, सोसयटीचे माजी अध्यक्ष साधू पाटील, डॉ. अजय पाटील उपस्थित होते.
आ. नाईक म्हणाले, भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी व पक्षाने जनतेला फक्त आश्वासनावर झुलवत ठेवले. प्रत्यक्षात काम काहीच केले नाही. शिराळा मतदार संघात तर गेल्या पाच वर्षांत विकास थांबला होते. आता राज्यात सत्ता बदल होऊन महाआघाडीचे सरकार आले आहे. हे सरकार शेती, शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्यांचा आगामी काळात विकास साधेल. मंत्री जयंतराव पाटील यांच्या सहकार्याने शिराळा मतदार संघात खोळंबलेला विकास गतीमान करणार आहे. सार्वजनिक हिताच्या कामांना प्राधान्य राहील. विकासाचा प्रवाह अखंड राहील.
या विभागात अनेक वर्षापासून खोळंबलेली वाकुर्डे योजनेची कामे पूर्णत्वाकडे नेवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम होईल. त्यामुळे इतर पक्षातील असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या प्रवाहात सहभागी होत आहेत. नव्या, जुन्या सर्वच कार्यकर्त्यांना बरोबर घेवून विकासात अग्रेसर राहू, असाही विश्वास आ. नाईक यांनी शेवटी व्यक्त केला.प्रास्ताविक विश्वासचे माजी संचालक भीमराव पाटील यांनी केले.
यावेळी माजी सरपंच शिवाजीराव शेटके, बाजार समीतीचे माजी सभापती हिंदुराव बसरे, शामराव दळवी, शामतराव शेटके, संग्राम बसरे, सुरेश सावंत, विलास कांबळे, अण्णा वाघ, कृष्णा वाघ, एकनाथ वाघ यांच्यासह भाजपच्या इतर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा सत्कार आमदार नाईक व उपसभापती नाईक यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमात बापू सकटे, अशोक सकटे, दादासो पडवळ, रमेश माने, मनोहर आलुगडे, नाना वाघ, राजेंद्र नायकवडी, अनिल मोरे, शिवाजी डफळे, वसंत शेटके, दिनकर मंडले, बाळू जाधव, विलास कांबळे, गणपती झोळे आदी मान्यवर उपस्थित होते.