मुंबई – विधानसभेची मुदत संपण्यास काही तसेच शिल्लक राहिले असताना घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. अशातच भाजपाकडून राष्ट्रपती राजवट आणण्याचा डाव सुरु आहे, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहे.
विजय वडेवट्टीवार म्हणाले कि, निवडणुकीपूर्वी भाजपाने फोडाफोडी केली हे जनतेने सहन केले नाही. भाजपा जनतेशी बेईमानी करते आहे. महाराष्ट्र भाजपाला कधीही माफ करणार नाही. आमचे आमदार फुटणार नाहीत असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
ते पुढे म्हणाले, राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात आली तर ते भाजपाचे पाप असेल यात काहीही शंका नाही. भाजपाने एकदा समोर येऊन सांगावे की आम्ही सत्ता स्थापन करु शकत नाही. दुसऱ्यांना संधी द्या. स्वतः सरकार स्थापन करायचे नाही आणि दुसऱ्याला संधी द्यायची नाही. भाजपाकडून राष्ट्रपती राजवट आणण्याचा डाव सुरु आहे, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहे.
Vijay Wadettiwar, Congress& leader of opposition in Maharashtra Assembly: We have not moved our MLAs anywhere, all our MLAs are at their locations. If some of our MLAs have gone to any place it might be a personal visit. pic.twitter.com/YW87fJNAV5
— ANI (@ANI) November 8, 2019