नवी दिल्ली – देशात जे काही होते त्याची सुरूवात गुजरातपासून होते. महात्मा गांधी यांनी गुजरातमधूनच देशासाठी मोठे आंदोलन सुरू केले होते. सरदार वल्लभभाई पटेल यांनी गुजरातपासूनच प्रेरण भारत जोडण्याचे काम सुरू केले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला विश्वगुरू बनवण्याच्या दिशेने पाउल उचलले आहे. त्यामुळेच गुजरात विधानसभेची निवडणूक मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठीची पायाभरणी असून आम्ही मोठ्या फरकाने विजय मिळवणार असल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आसामचे मुख्मंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी व्यक्त केली आहे.
टिपु सुलतानाचा पुतळा उभारण्याची घोषणा केल्याने कॉंग्रेस आमदाराला ठार मारण्याची धमकी
एका इंग्रजी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सरमा यांनी बऱ्याच प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली. ते म्हणाले, उत्तराखंडची निवडणूक आणि त्यानंतर हिमाचल प्रदेशची निवडणूक आमच्या घोषणापत्रात आम्ही म्हटले होते की एका व्यक्तीला चार-पाच विवाह करण्याचा अधिकार असता कामा नये. तसेच मुलींना समान अधिकार असले पाहिजेत. समान नागरी कायद्याचा यापेक्षा वेगळा अर्थ काय आहे.
हिंदू असो वा मुसलमान कोणाचीही या कायद्याला हरकत असायला नको. संविधानात जे आहे ते सगळे योग्य आहे. देशाच्या संविधान सभेने जे बनवले तेच देशाचे संविधान आहे. त्यावेळी त्यांना संधी होती हिंदू संविधान लिहिण्याची. मात्र हिंदूंची विचारच सर्वधर्म समभाव असे असतात. तो त्यांच्या चारित्र्याचा भाग असतो. त्यामुळे त्यांनी संविधानात हिंदू राष्ट्र असे पुढे लिहिले नाही. मात्र याचा अर्थ असा होत नाही की भारत हिंदू राष्ट्र नाही. हिंदू संस्कृती म्हणजेच भारत आहे.
टिपु सुलतानाचा पुतळा उभारण्याची घोषणा केल्याने कॉंग्रेस आमदाराला ठार मारण्याची धमकी
राहुल गांधी यांच्याबाबत टिप्पणी
सरमा यांनी मुलाखतीत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडोबाबत प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की जेव्हा हिमाचल प्रदेशात निवडणूक होती तेव्हा ते केरळमध्ये होते. जेव्हा गुजरातमध्ये निवडणूक आहे तेव्हा ते महाराष्ट्रात आहेत. आता गुजरातच्या निवडणुकीत ते काय करणार देवलाच ठाउक. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मार्ग प्रशस्त व्हावा असा मोठा विजय गुजरातमध्ये मिळवणे हेच आमचे लक्ष्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोण आहेत सरमा
सरमा हे पूर्वाश्रमीचे कॉंग्रेसचे नेते आहेत. मात्र ते भाजपमध्ये दाखल झाल्यावर फार वेगाने त्यांची प्रगती झाली आहे. आपल्या धडक विधानांमुळे ते कायम चर्चेत असतात आणि आज अशी स्थिती आहे की इशान्येकडच्या भागात ते भाजपचा सगळ्यांत प्रभावी चेहरा झाले आहेत. प्रादेशिक राजकारणातून बाहेर पडत त्यांची वेगाने राष्ट्रीय राजकारणाच्या दिशेने वाटचाल सुरू असून भाजपनेही त्यांच्यावर विश्वास टाकला आहे.