नवी दिल्ली – कॉंग्रेस पक्षाच्या भारत जोडो यात्रेमुळे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे दोघेही अस्वस्थ झाले असल्याचा दावा कॉंग्रेसच्या प्रवक्त्याने केल्यानंतर कॉंग्रेसची ही यात्रा म्हणजे राहुल गांधी यांना री- लॉन्च करण्याचे अभियान असल्याचे प्रत्युत्तर भाजपचे प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी दिले आहे.
एका कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पुनावाला म्हणाले की, भारत जोडो करण्यापूर्वी कॉंग्रेसने आपल्या नेत्यांना अगोदर जोडावे. त्यांनी गुलाम नबी आझाद, मनीष तिवारी, आनंद शर्मा या नेत्यांना जोडण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला मी त्यांना देईल.
जर ते नेते पुन्हा कॉंग्रेसशी जोडले जात नसतील तर किमान कॉंग्रेसने एका कुटुंबाला तरी सोडावे. तेही त्यांच्याकडून होत नसेल तर त्यांनी लांगुलचालन आणि भ्रष्टाचार सोडावा.