मुंबई – भाजपच्या चेहऱ्यावरील मुखवटे संपता संपत नाहीत. त्यामुळेच 2015 जागा असूनही भाजपला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली आहे, असा घणाघात आजच्या सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे. शिवाय, शिवसेनेच्या खऱ्या चेहऱ्याबाबत बोलणाऱ्या भाजपनं आधी स्वत:चा चेहरा आरशात पाहावा, असा सल्लाही सामना अग्रलेखातून देण्यात आला आहे.
तर, 2014 साली शिवसेनेचा सत्तेचा प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळल्याचा दावा दोन दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाणांनी केला होता. त्यावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं गांभीर्यानं मत व्यक्त केलं नाही. तर, तेव्हाची परिस्थिती सांगत चव्हाणांच्या दाव्यात तथ्य नसल्याचंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. पण विरोधी पक्षानं मात्र ते फारच गांभीर्यानं घेतलं, आणि त्यात स्वत:चा चेहराच ओरबाडल्याचंही म्हटलं आहे.
काय आहे सामनाच अग्रलेख
2014 सालचीच शिवसेना आजही आहे . भाजपला ‘105’ असूनही विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली . कारण भाजपच्या चेहऱ्यावरचे मुखवटे संपता संपत नाहीत . बोलायचे एक व करायचे दुसरेच . हे 2019 सालीही झाले . त्याचे दृश्य फळ म्हणजे महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला व गुरूमहाराजांनी प्रयत्न केले तरी शरद पवारांनी भाजपची कुरघोडी होऊ दिली नाही . अर्थात सोनिया गांधी यांनी महाविकास आघाडी सरकारचा प्रस्ताव फेटाळला नाही . 2014 साली अशा प्रस्तावांना कागदाच्या चुरगळलेल्या कपटय़ाचीही किंमत नव्हती . याचा अभ्यास श्री . फडणवीस व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला तर स्वतःच्याच चेहऱ्यावरील मुखवटे खाजवत बसण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही .