नवी दिल्ली – कोणाही नेत्यांने कोणत्याही धर्माच्या विरोधात आक्षेपार्ह भाषा वापरणे योग्य नाही. भारतीय जनता पक्षाने आपल्या नेत्यांना आता आवण्याची गरज असून आक्षेपार्ह वक्तव्ये करणाऱ्या प्रवक्त्यांना त्यांनी तुरूंगात पाठवले पाहिजे अशी मागणी बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी केली आहे.
ट्विटरवर त्या म्हणाल्या की, कोणत्याही धर्मासाठी आक्षेपार्ह भाषा वापरणे योग्य नाही. या प्रकरणी भाजपने आपल्या लोकांवर कठोर कारवाई केली पाहिजे. त्यांना केवळ निलंबित करून किंवा पक्षाबाहेर काढून चालणार नाही, त्यांना कारागृहातच पाठवले पाहिजे.
अल्पसंख्याकांवरील कथित वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपने रविवारी आपल्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून निलंबित केले आणि दिल्लीचे मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांची हकालपट्टी केली.त्या पार्श्वभूमीवर मायावती यांनी ही सुचना केली आहे.