नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात असून निवडणूक प्रचारात नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे दिल्लीतील शाहिनबागमध्ये सीएए आणि एनआरसी विरोधात प्रदर्शन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेता प्रकाश राज यांनी ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
DELHI ELECTIONS. @BJP4India GOLI..BIRIYANI..TERRORISTS…HATE SPEECH.. don’t you have anything else to talk about #justasking SHAME ON YOU
— Prakash Raj (@prakashraaj) February 4, 2020
दरम्यान, प्रकाश राज यांनी ट्विट केले आहे की,’दिल्ली निवडणुकांमध्ये भाजप पक्षाकडून गोळ्या , बिर्याणी , आतंकवाद आणि हिसेचाच प्रचार सुरु आहे या व्यतिरिक्त भाजपकडे दुसरे प्रचारासाठी मुद्दे नाही का ? भाजप पक्षाला लाज वाटायला हवी.’ असं म्हणत प्रकाश राज यांनी भाजप पक्षावर टीका केली आहे. सध्या त्यांच्या या ट्विटला सोशल मीडियावर युजर्स कडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.