मुंबई: महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरून चांगलाच गोंधळ सुरु आहे. आज देवेंद्र फडणवी यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पत्रकार परिषद घेत शिसेनेला लक्ष केले. शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा करायला वेळ आहे पण भाजपसोबत चर्चा करायला वेळ नाही, असे विधान केले. तसेच मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेनेसोबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले.
यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्लाबोल केला. मला खोटं ठरवलं जात आहे. जोपर्यत भाजप खोटारडेपणा मान्य करत नाही तोपर्यंत चर्चा होणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. गेली पाच वर्ष भाजप खोटं बोलत आहे. आम्ही महाराष्ट्रात शिवसेनेचाचं मुख्यमंत्री बसवणार त्यासाठी आम्हाला नरेंद्र मोदी, अमित शहा आणि फडणवीस यांच्या आशीर्वादाची गरज नाही.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी केलेले आरोप भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी फेटाळले आहेत. ते म्हणाले चर्चा सोडून शिवसेना आरोप करत आहेत.