नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत भाजपने पत्रकार परिषद आयोजित केली होती. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदाज पत्रकार परिषदेला हजर होते. भाजपच्या मुख्यालयात ही पत्रकार परिषद पार पडली.
प्रत्येक क्षेत्रात आम्ही विकास केला आहे. सरकारने केलेली कामं तळागाळापर्यंत पोहोचली आहेत. मोदींच्या सरकारमध्ये लोक स्वताला जास्त सुरक्षित समजतात. आज आमच्या सरकारला 5 वर्ष पूर्ण झालीत आणि आम्हाला जनता पुन्हा संधी देईल हा आम्हाला विश्वास आहे, असं अमित शाह यावेळी म्हणाले.
ही पहिली निवडणूक आहे ज्यामध्ये विरोधकांकडे महागाई आणि भ्रष्टाचार असे मुद्दे त्यांच्याकडे नव्हते, असंही शाह म्हणाले.
अमित शाह यांच्या पत्रकार परिषदेमधील महत्वाचे मुद्दे –
अमित शाह म्हणाले की, ही निवडणूक स्वातंत्र्यानंतर भाजपच्या दृष्टीने सर्वाधिक मेहनत करणारी आहे. सर्वात मोठं आणि विस्तृत अभियान होतं. पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन करण्यासाठी जनतेचा उत्साह भाजपपेक्षा जास्त होता.
ये चुनाव आजादी के बाद के चुनाव में भाजपा की दृष्टि से सबसे ज्यादा मेहनत करने वाला, सबसे विस्तृत चुनाव अभियान रहा है।
इस चुनाव में हमारा अनुभव के अनुसार जनता हमसे आगे आगे रही है।
मोदी सरकार फिर से बनाने के लिए जनता का उत्साह भाजपा से आगे रहा है: श्री अमित शाह #DeshKaGauravModi pic.twitter.com/PPRp18scZk
— BJP (@BJP4India) May 17, 2019
मोदींनी 142 प्रचारसभा केल्या, 4 रोड शो केले. 1 कोटी 50 लाख पेक्षा जास्त नागरिकांसोबत पंतप्रधानांनी संपर्क साधला.
कुल 142 जनसभाओं को मोदी जी ने इस चुनाव में संबोधित किया है और 4 रोड शो किये।
इन जनसभाओं में अनुमानित 1 करोड़ 50 लाख से ज्यादा लोगों के साथ नरेन्द्र मोदी जी ने संपर्क स्थापित किया है: श्री अमित शाह #DeshKaGauravModi
— BJP (@BJP4India) May 17, 2019
आम्ही 50 कोटी गरीबांचे जीवनस्तर उंचावले. त्यांना मुलभूत सुविधा देऊन देशाच्या विकासात त्याचाही वाटा असल्याची जाणीव आमच्या सरकारनं करून दिली.
हमने 50 करोड़ गरीबों के जीवन स्तर को ऊंचा उठाया है। उन्हें आधारभूत सुविधाएं देकर एहसास दिया है कि देश के विकास में उनकी भी हिस्सेदारी है: श्री अमित शाह #DeshKaGauravModi
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) May 17, 2019
पुढे बोलताना ते म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकराने प्रत्येक 15 दिवसात नव्या योजना आणल्या. समाजातील प्रत्येक वर्गाला त्या योजनेचा लाभ मिळाला. एकूण 133 योजना सरकारने राबवल्या.
देश के गरीब, किसान, महिला, गांव, शहर समाज के हर वर्ग को हमारी सरकार की 133 योजनाओं ने छुआ है। 133 योजनाओं के आधार पर देश में नई चेतना की जागृति हुई है: श्री अमित शाह #DeshKaGauravModi
— BJP (@BJP4India) May 17, 2019
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्याचा प्रचार संपला आहे. शेवटच्या म्हणजेच सातव्या टप्प्यात रविवारी 19 मे रोजी पश्चिम बंगाल, मोदींच्या वाराणसीसह 59 जागांसाठी मतदान होत आहे