मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची एका हॉटेलमध्ये भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांत सुमारे अडीच तास चर्चा झाली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला प्रारंभ झाला होता. परंतु, त्यात कोणताही राजकीय हेतू नसल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले होते. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मोठा दावा केला आहे.
दोन पक्षांचे बडे नेते भेटत असतील तर नक्कीच राजकीय चर्चा होतेच. ते दोन ते अडीच तास चहा बिस्कीटावर तर चर्चा होणार नाही. पण ही कोणतीही निर्णयात्मक बैठक नव्हती, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
If top leaders of 2 different political parties meet, political discussions do take place. If they sat together for 2-2.5 hrs, they didn’t discuss tea-biscuits. But it was inconclusive: Chandrakant Patil, Maharashtra BJP chief on meeting b/w Sanjay Raut & Devendra Fadnavis(28.09) pic.twitter.com/r4N3azh2NB
— ANI (@ANI) September 29, 2020
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसल्याने महाराष्ट्रात सध्या मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती असल्याचेही म्हंटले होते.
पैसे किंवा खर्च हा एकमेव मुद्दा नसतो तर खूप वेळ जातो, अनिश्चतता असते. मध्यावधी निवडणूक होऊ नये म्हणून सगळेच प्रयत्न करतील. पण शेवटी कुणाचेच जुळले नाही, तर काहीही पर्याय उरणार नाही, असेही त्यांनी सांगितले होते.