कोंढवा – देशाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टीच एकमेव निःपक्ष व राष्ट्रहित जपणारा पक्ष आहे, त्यामुळे युवापिढीने भाजपाला साथ देत समाजकार्य केल्यास देशांचा समतोल समाजविकास होईल, असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
भारतीय जनता पार्टीच्या युवा कार्यकर्त्या प्रियंका शितोळे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची सदिच्छा भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे विचार व धोरणे तळागळापर्यंत पोहचविण्याचा मनोदय व्यक्त केला, त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते. यावेळी भाजपा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, राजेंद्र जांभुळकर, प्रमोद शितोळे, प्रविण कदम, प्रणिता चिटणीस आदी उपस्थित होते.
प्रियंका शितोळे म्हणाल्या की, सामाजिक बांधिलकी जपत केंद्र व राज्य सरकारची ध्येयधोरणे, विविध उपक्रम व योजना तळगळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवून सामाजिक समतोल जोपासून पक्षवाढीसाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे शितोळे यांनी सांगितले.
भारतीय जनता युवा पार्टीचे कार्य पक्षातील वरिष्ठ नेते, पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य प्रकारे सुरू आहे. सरुवातीच्या काळात शहरापुरते मर्यादित असलेले कार्य ग्रामीण भागातील युवकांपर्यंत पोहचले आहे. तळागळात भाजप पक्ष मजबूत करण्यामध्ये युवकांचेही मोठे योगदान असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.