मुंबई : राज्यातील महिलांवर होणारे अत्याचार आणि त्यात सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर आणि मंत्र्यांवर झालेल्या आरोपावरून भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. भाजपच्या महिला नेत्या चित्र वाघ यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे वनमंत्री संजय रोठाड यांना पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी राजीनामा द्यावा लागला. यानंतर आता भाजपच्या महिला आमदार श्वेता महाले आक्रमक झाल्या आहेत.
श्वेता महाले यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करणारे खोचक ट्विट केलं आहे. त्यांचं हे ट्विट सरकारच्या जिव्हारी लागणार आहे. राज्यात घडत असलेल्या घटनांना धरून महाले यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं.
पूजा चव्हाणने आत्महत्या केली, हिरेन मनसुखने आत्महत्या केली, जळगावच्या त्या महिलेने गर्मी लागत होती म्हणून झगा काढून ठेवला. ज्यांच्यावर बलात्कार झालेत त्यात त्या महिलांची चुकी आहे. पण सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे मेहबूब शेख, वाघमारे, संजय राठोड अगदी निरागस आहे म्हणत राज्याला धोका मात्र सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांच्याकडून असं म्हणत आमदार महाले यांनी सरकारची खिल्ली उडवली.
पूजा चव्हाणने आत्महत्या केली,
हिरेन मनसुखने आत्महत्या केली,
जळगावच्या त्या महिलेने गर्मी लागत होती म्हणून झगा काढून ठेवला होता
ज्यांच्यावर बलात्कार झालेत त्यात त्या महिलांची चुकी आहे,
मुंडे,शेख,वाघमारे, राठोड अगदी निरागस आहेत आणि
राज्याला धोका सचिन,लतादीदी,अमिताभ, अक्षय कडून आहे. pic.twitter.com/HbfgBkTGM9— MLA Shweta Mahale Patil (@MLAShwetaMahale) March 6, 2021
श्वेता महाले या बुलडाणा जिल्ह्यातील चिखली मतदार संघातील भाजपच्या आमदार आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या राहुल बोंद्रे यांचा पराभव केला होता. त्यांनी केलेलं ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.