एकीकडे आरोग्यविषयक आणीबाणीशी लढाई सुरू आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत परिस्थिती काहीशी सुधारली असली, तरी ती अजून पूर्णपणे रुळावर आलेली नाही. त्यातच लोकांसमोर सध्या भीषण संकट उभे आहे ते इंधन दरवाढीचे. गेल्या दोन वर्षांमधील उच्चांकी दर पेट्रोल-डिझेलने आता गाठला आहे.
असे असतांनाच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे मंत्री विश्वास सारंग यांनी शनिवारी एक अजब – गजब विधान केले. ते म्हणाले,’ नेहरु कुटुंबाने स्वातंत्र्यानंतर देशाची आर्थिक स्थिती डबघाईस आणली. कुठल्याही देशात महागाई एक दिवसांत वाढत नाही, तसेच एक दिवसात सुधारतही नाही. 15 ऑगस्ट 1947 ला लाल किल्ल्यावरून पंडित जवाहरलाल नेहरु यांनी जे भाषण केले होते त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था खराब झाली’
दरम्यान, भाजप मंत्री विश्वास सारंग यांच्या वक्तव्यावरुन सध्या देशात राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यांनी केलेल्या या विधानावर काँग्रेसचे कार्यकर्ते, आमदार, खासदार, मंत्री संतप्त झाले असून आपला संताप व्यक्त करत आहेत.