पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल (युनायटेड) तर्फे आज भारतीय जनता पक्षाच्या संभाव्य षडयंत्रापासून जनतेला सावध करण्यासाठी राज्याच्या विविध भागात सतर्कता मार्च काढण्यात आला.
भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकीच्या हेतून सांप्रदायिक फूट पाडण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो या पार्श्वभूमीवर जनते मध्ये सतर्कता निर्माण करण्यासाठी या फेऱ्या सगळीकडे आयोजित करण्यात आल्या होत्या. जेडीयुचे अध्यक्ष राजीव रंजन यांच्या नेतृत्वाखाली पाटण्यात हा मार्च काढण्यात आला. त्यात संसदीय मंडळाचे प्रमुक उपेंद्र कुशवाह आणि अन्य नेते सहभागी झाले होते.
पत्रकारांशी बोलताना कुशवाह म्हणाले की, भाजपने सांप्रदायिक फूट वाढवण्याची योजना आखली आहे जेणेकरून लोकसंख्येचा एक मोठा भाग त्याच्या बाजूने जाईल असा त्यांचा इरादा आहे. केंद्रात सत्ता असताना काहीही साध्य न करता सत्तेवर टिकून राहण्यासाठी भाजपला असल्याच क्लुप्त्या अवलंबायच्या असतात. त्यामुळे भाजपच्या या षडयंत्राविषयी लोकांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे असे कुशवाह यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले. बिहारच्या सर्व 38 जिल्ह्यांमध्ये ही सतर्कता यात्रा काढण्यात आली.