नवी दिल्ली – भारतीय जनता पक्ष आणि शेतकरी यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष होण्याची चिन्हे दिसून येत आहे. कारण शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी भाजपावर तोफ डागत अप्रामाणिक पणाचा आरोप केला आहे. भाजप सरकारवर मतमोजणीत अप्रामाणिकपणाची शंका वर्तवत त्यांनी थेट मतदान केंद्रावर तळ ठोकला आहे.
शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी भाजप सरकारवर मतमोजणीत अप्रामाणिकपणाची शंका वर्तवली आहे. यूपीमध्ये कमीत कमी 70 जागा अप्रामाणिकपणे जिंकण्याची तयारी केली जात असल्याची शंका टिकैत यांनी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांनी एक रात्र आधीच मतमोजणीच्या ठिकाणी जमा व्हावे. आपल्या देखरेखीत मतमोजणी करून घ्यावी. अप्रामाणिकपणा झाल्यास शांततेने पुन्हा मोजणी करायला सांगा, असे आवाहन त्यांनी केले आहे. ईव्हीएमशी छेडछाड केल्याची शंका व्यक्त करत 11 जानेवारीपासूनच नवीन मंडी स्थिती स्ट्रॉंग रूमच्या आसपास आपले बस्तान बसवले आहे.