नवी दिल्ली – कोरोना व्हायरसमुळे भारताचे अतोनात नुकसान झाले आहे. असे असताना चीन सरहद्दीवर कुरापती करीत आहे. त्यामुळे चीनच्या वस्तूवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय भारताने घेतला असून, काही दिवसांपूर्वीच चीनच्या 59 अॅप्सवर बंदी घातली आहे. भारताने घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णयाचा चीनला मोठा फटका बसला आहे.
दरम्यान, अश्यातच आता उत्तर प्रदेशमधील बहराइचच्या भाजप आमदार आणि माजी मंत्री अनुपमा जायसवाल यांनी लोकांच्या मोबाईलमध्ये चीनी अॅप डिलीट करण्यासाठी खास अभियान सुरू केले आहे. यासाठी ते प्रत्येक अॅप डिलीट केल्यावर एक फेस मास्क मोफत देत आहेत.
अनुपमा जायसवाल यांनी सांगितले की, केंद्र सरकारने 59 चीनी अॅप्सवर बंदी घातल्यानंतर त्यांनी बहराइचच्या सर्वसामान्य लोकांच्या फोनमधून चीनी अॅप डिलीट करण्याचे अभियान सुरू केले आहे. सर्वसामान्य लोकांना प्रेरित करण्यासाठी प्रत्येक अॅप डिलीट केल्यावर त्यांना एक मास्क मोफत दिला जात आहे.