नवी दिल्ली – केंद्र सरकारने वाढवलेल्या घरगुती गॅस, इंधन दरवाढ व महागाई विरोधात देशात आंदोलन होत आहे. सामान्य जनतेने यांचा विरोध केला असून यावरून मोदी सरकारवर टीका केली जात आहे.
अचानकपणे सिलिंडरचे दर 25 रुपयांनी वाढवले. 20 दिवसाला 809 रुपये तर महिन्याला दीड हजार रुपये सिलिंडरमागे सर्वसामान्य जनतेला द्यावे लागणार आहेत. याचा निषेध सामान्य जनतेकडून होत आहे.
मोदींच्या केंद्र सरकारने महागाईने व इंधन दरवाढीने सर्वसामान्यांचे व गृहिणींचे बजेट कोलमडून टाकले आहे. जगावं की मरावं या प्रश्नाचे उत्तर “मन की बात’मध्ये दिसते त्यावेळी ते “मरावंच’ असं दिसतं असं म्हणत विरोधी पक्षातील नेत्यांकडून मोदी सरकारवर हल्ला बोल होत आहे. आता याच मुद्यावर मध्य प्रदेशचे ऊर्जामंत्री प्रद्युम्नसिंग तोमर यांनी लोकांना असा अजब सल्ला दिला की, ‘मंडईत भाजी आणायला जाताना सायकल वापरा. त्याने प्रकृतीही उत्तम राहील व प्रदूषणही होणार नाही. तेल दरवाढीतून जो पैसा मिळणार आहे, त्यातून गरीब लोकांना दिवाळीपर्यंत मोफत अन्नधान्य देण्यात येणार आहे. ‘ त्यांचा या सल्ल्यामुळे सध्या ते चर्चेत आले असून त्यांच्यावर सोशलवर टीका होत आहे.