मुंबई – राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने पदवी व पदव्युत्तरच्या अंतिम वर्ष आणि सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांची काही विषय बॅकलॉग राहिले आहेत. त्यांची परीक्षा होणार की नाही, याविषयी काहीच स्पष्टता नाही. त्यामुळे बॅकलॉगच्या विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. यावरून भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांना टोला लागलेला आहे. आशिष शेलार यांनी उद्या सामंत यांची तुलना थेट रात्रीस खेळ चालेमधील पांडूशी केली आहे.
आशिष शेलार म्हणाले कि, ‘रात्रीस खेळ चाले” मध्ये पांडू “इसरतो” तसे आमचे कोकणचे उच्च शिक्षण मंत्री निर्णयाची “योग्य वेळ” इसरले की काय? नाहीतर म्हणायचे, काय त्या? परिक्षा कित्याक..? अण्णानु “इसरलंय”…. म्हणून आठवण करुन देतो विद्यार्थी हित आणि ATKT च्या आमच्या विद्यार्थ्यांसाठी हा पाठपुरावा!, असे त्यांनी म्हंटले आहे.
‘रात्रीस खेळ चाले” मध्ये पांडू “इसरतो” तसे आमचे कोकणचे उच्च शिक्षण मंत्री निर्णयाची “योग्य वेळ” इसरले की काय?
नाहीतर म्हणायचे, काय त्या? परिक्षा कित्याक..? अण्णानु “इसरलंय”….
म्हणून आठवण करुन देतो
विद्यार्थी हित आणि ATKT च्या आमच्या विद्यार्थ्यांसाठी हा पाठपुरावा!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 16, 2020
दरम्यान, राज्य शासनाने अंतिम सत्र परीक्षा रद्द केले. मात्र एकूण परीक्षेच्या जवळपास 30 टक्के विद्यार्थ्यांचे काही विषय राहिले आहेत. त्याची संख्याही काही हजारांवर आहे. सुमारे 8 लाख विद्यार्थ्यांची सुरक्षिततेच विचार करून अंतिम सत्र करण्यात आले. मात्र बॅकलॉग विद्यार्थ्यांची संख्याही राज्यभरात सुमारे अडीच लाखांपर्यत असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या परीक्षेचा काय निर्णय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.