मुंबई – भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे व भाजप नेते प्रसाद लाड यांच्यादरम्यान चांगलीच शाब्दिक चकमक रंगल्याचं पाहायला मिळतंय. एकनाथ खडसे यांनी काल प्रसाद लाड यांना प्रतिउत्तर देताना, ‘मी जनतेतून ६ वेळा निवडणूक आलोय लाड यांनी किमान एकदा तरी जनतेतून निवडणून यावं’ असं आव्हान दिलं होत. खडसेंनी दिलेल्या आव्हानावर आता लाड यांनी देखील तिखट प्रतिउत्तर दिल असून आपण स्वतः ७ वेळा निवडून येऊ असा विश्वासही व्यक्त केला आहे.
खडसेंना प्रतिउत्तर देताना लाड यांनी, “आजवरच्या राजकारणात भाजप संघटन आणि रा.स्व.संघाच्या जीवावर निवडून येणारे स्वतःच्या मुलीला निवडून आणू शकले नाहीत. तरीही पक्ष नेतृत्वाला दोष देऊन पक्ष त्याग केला.ज्या पक्षाने एवढं दिलं,अटलजी आणि मोदींच्या जीवावर निवडून येऊन पद उपभोगली,तेच नेते आता इतरांना शिकवत आहेत. ” असा घणाघात केला.
यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांच्या राजकीय वजनावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ते म्हणाले, “स्वतःची एवढी ताकद होती, तर स्वतःच्या मुलीला का निवडून आणू शकले नाहीत? मी नक्कीच स्वतः ७ वेळा निवडून येईन याची मला खात्री आहें!”
आजवरच्या राजकारणात भाजप संघटन आणि रा.स्व.संघाच्या जीवावर निवडून येणारे स्वतःच्या मुलीला निवडून आणू शकले नाहीत. तरीही पक्ष नेतृत्वाला दोष देऊन पक्ष त्याग केला.ज्या पक्षाने एवढं दिलं,अटलजी आणि मोदींच्या जीवावर निवडून येऊन पद उपभोगली,तेच नेते आता इतरांना शिकवत आहेत.@EknathGKhadse
— Prasad Lad (@PrasadLadInd) November 18, 2020
तत्पूर्वी, लाड यांनी शरद पवार यांच्या नियोजित उत्तर महाराष्ट्र दौऱ्याबाबत वक्तव्य करताना या दौऱ्याचा भाजपवर काहीही परिणाम पडणार नाही असं वक्तव्य केलं होत. यावेळी त्यांनी, ‘एकनाथ खडसे यांना डोक्यावर घेऊन महाविकास आघाडी सरकार देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करतंय.’ असा आरोपही लगावला होता. लाड यांना खडसेंनी प्रतिउत्तर देत त्यांना जनतेतून निवडून येण्याचं आव्हान दिलं होत यातूनच ही शाब्दिक चकमक रंगल्याचं पाहायला मिळालं.