नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल आले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला जोरदार झटका बसला असून आम आदमी पक्षाने पुन्हा एकदा दिल्लीची सत्ता काबीज केली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुक प्रचारादरम्यान दरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक वार झाले होते. भाजप नेते कपिल मिश्रा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दहशतवादी म्हंटले होते, तर दिल्लीच्या शाहीन बागेत ‘का’ कायद्या विरोधात निदर्शने करणाऱ्या नागरिकांना पाकिस्तानी म्हटले होते.
2015 साली कपिल मिश्रा यांनी दिल्लीत ‘आप’च्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. 2015 मध्ये त्यांना आप सरकारने जल मंत्रालयाची जबाबदारी दिली होती. मात्र त्यांनतर त्यांनी ‘आप’ला सोडचिट्ठी देत भाजपचे कमळ हाती घेतले होते. त्यांनी यावेळी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. मॉडेल टाऊनहॉल मतदार संघातून ते भाजपचे उमेदवार होते. मात्र त्यानं ‘आप’चे उमेदवार अखिलेश त्रिपाठी यांनी 11 हजार मतांनी पराभव केला.
परवेश वर्मा यांचा प्रयत्न अपयशी
पश्चिम दिल्लीतील भाजपा खासदार परवेश वर्मा याचा प्रभाव झाला आहे. त्यांनी संपूर्ण प्रचारादरम्यान बिर्याणी, शाहीन बाग, बांगलादेश, पाकिस्तान, दहशतवादी अशा शब्दांचा वापर केला होता. पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघा अंतर्गत येणाऱ्या सर्व विधानसभेच्या 10 जागा भाजपने गमावल्या आहेत. पश्चिम दिल्ली भागात टिळक नगर, मटियाला, मडीपूर, उत्तम नगर, जनकपुरी, विकासपुरी, हरी नगर आणि द्वारका असे मतदार संघ आहे. या सर्व जगावर आपचे उमेदवार विजयी झाले आहेत.
जनतेने तेजिंदरसिंग बग्गा यांना जनतेने नाकारले.
हरि नगर विधानसभा मतदारसंघातून भाजपाने तजिंदरसिंग बग्गा यांना उमेदवारी दिली होती. दिल्लीच्या राजकारणात तजिंदरसिंग बग्गा प्रसिद्ध आहेत. निवडणूक प्रचारादम्यान त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अतिरेकी म्हटले होते.त्यांना ‘आप’च्या राजकुमारी ढिल्लो यांनी 17 हजाराहून अधिक मतांनी तेजिंदरसिंग बग्गा यांचा प्रभाव केला.
दरम्यान आतापर्यंतच्या हाती आलेल्या निकालात आम आदमी पक्ष 63 जगावर आघाडीवर आहे. तर भाजप केवळ 7 जागांवर आघाडीवर आहे. तर 2015 ची पुनरावृत्ती करत पुन्हा एकदा काँग्रेसला भोपळा मिळालेला आहे.