मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांमध्ये जमिनीचे 21 व्यवहार झाल्याचा दावा करत अनेक गंभीर आरोप केले. उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईक कुटुंबीयासोबत नेमके काय संबंध आहेत हे जाहीर करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या शैलीत ट्वीट करत सडेतोड उत्तर दिले आहे.
तर आता या मुद्यावरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनीदेखील आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
भावांनो समजुन घ्या….
मुख्यमंत्री जमीन खरेदीत खूपच व्यस्त असल्यामुळे राज्यातल्या समस्या हाताळण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळत नसावा…
फक्त अन्वय नाईक कुटुंबियांसोबत 21 व्यवहार झालेत. खरच हा ‘जमीन से जुडा हुवा’ मुख्यमंत्री है… pic.twitter.com/myig2jUG6a— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 12, 2020
काय म्हणाले अतुल भातखळकर
“भावांनो समजुन घ्या. मुख्यमंत्री जमीन खरेदीत खूपच व्यस्त असल्यामुळे राज्यातल्या समस्या हाताळण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळत नसावा. फक्त अन्वय नाईक कुटुंबीयांसोबत २१ व्यवहार झालेत. ,” असं म्हणत भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.