मुंबई: भारतीय जनता पार्टीने बंडखोरी करणाऱ्या ४ नेत्यांना पक्षातून काढून टाकले आहे. भाजपाने किंवा मित्रपक्षांनी आधीच अधिकृत केलेले उमेदवार असलेल्या मतदार संघात उमेदवारी अर्ज मागे न घेतलेल्या ४ बंडखोर नेत्यांची हकालपट्टी केली आहे.
भाजपाने चरण वाघमारे (तुमसर), गीता जैन (मीरा भाईंदर), बाळासाहेब ओव्हाळ (पिंपरी-चिंचवड) आणि दिलीप देशमुख (सुमेरपूर) यांना काढून टाकले.
यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना बंडखोर नेत्यांना समजावून सांगू, ऐकत नसल्यास त्यांना त्यांची जागा दाखवू, असे म्हटले होते.
BJP has expelled it’s 4 rebel party leaders who had not taken their nominations back where already BJP or its allies’ have authorized candidates. BJP has expelled Charan Waghmare (Tumsar), Geeta Jain (Mira Bhayandar), Balasaheb Ovhal (Pimpri-Chinchwad)&Dilip Deshmukh (Sumerpur)
— ANI (@ANI) October 10, 2019