लखनौ – भाजप एक्झिट पोलच्या माध्यमातून मते चोरायचा प्रयत्न करत आहे, असा आरोप समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला आहे. उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणूकीमध्ये भाजपचाच विजय होणार आहे, असे चित्र निर्माण करण्यासाठी बाजपचा हा प्रयत्न असल्याचे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.
लखनौमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मतमोजणी संथ गतीने व्हावी, अशा सूचना वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांकडून आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना दिल्या जात असल्याचा आरोपही अखिलेश यादव यांनी यावेळी केला. ज्या मतदार संघांमध्ये भाजपच्या उमेदवारांची जिंकण्याची शक्यता कमी आहे, तेथे ही मतमोजणी रात्री उशिरापर्यंत चालावी, असा भाजपचा प्रयत्न आहे.
विशेषतः 47 जागांवर भाजपचे उमेदवार गेल्या वेळेला अत्यंत कमी मताधिक्याने विजयी झाले होते. तेथे या सूचना दिल्या गेल्या आहेत, असे अखिलेश यादव म्हणाले. भाजपकडून इव्हिएम नेणारे ट्रक चौरले गेले असून ते वारामसीमध्ये पकडले गेल्याचेही त्यांनी सांगितले.