बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. दुष्काळ, बेरोजगारी, विकासातली अधोगती, कोलमडलेली अर्थव्यवस्था यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलायचं सोडून हे सरकार पवार कुटुंबियांवर टीका करत बसलं आहे. मतं खाण्यासाठी भाजपा सरकार साम-दाम-दंड-भेद या साऱ्या नीतीचा अवलंब करत आहे. ही लोकशाही नव्हे तर, हुकूमशाही असल्याचे अजित पवार म्हणाले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या शुभारंभ कार्यक्रमाला अजित पवारांनी उपस्थिती लावली. दरम्यान त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.
दुष्काळ, बेरोजगारी, विकासातली अधोगती, कोलमडलेली अर्थव्यवस्था यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलायचं सोडून हे सरकार पवार कुटुंबियांवर टीका करत बसलं आहे. मतं खाण्यासाठी भाजपा सरकार साम-दाम-दंड-भेद या साऱ्या नीतीचा अवलंब करत आहे. ही लोकशाही नव्हे तर, हुकूमशाही आहे.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 8, 2019