नवी दिल्ली: भाजपाने संविधानाची सर्कस केली आहे. त्यांनी लोकशाहीला द्रौपदी, तर जनमताला बंधक बनवले आहे. द्रौपदीचं वस्त्रहरण करणाऱ्या कौरवांचं जे झाले होते तेच राजस्थानची कृष्णरूपी जनता भाजपाच्या कटाचं करेल. आता न्याय मिळेल, असे ट्विट करत कॉंग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
सुरजेवाला म्हणाले, जेव्हा कॉंग्रेसकडे बहुमत आहे, सभागृहदेखील भरवायचं आहे, तसेच हा अधिकार सरकारचा आहे तेव्हा भाजपावाले आणि त्यांचे अनुयायी का पाठ दाखवून पळून जात आहे. दिल्लीत सत्तेवर बसलेल्यांना विधिमंडळात बहुमताची भीती का वाटत आहे?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, आमदारांच्या घोडेबाजाराच्या आरोपानंतर राजस्थानात राजकीय संघर्ष उफाळून आला. हा संघर्ष अजूनही थांबलेला नाही. अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट असा संघर्ष मागील आठवडाभरापासून बघायला मिळत आहे. या सत्तानाट्यावरून सुरजेवाला यांनी भाजपवर हल्लाबोला केला आहे.