नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाला झारखंड विधानसभा निवडणुकीत धक्का बसण्याची शक्यता आहे. झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) – कॉंग्रेस आघाडी विधानसभेच्या ४२ जागांवर आघाडीवर आहे. सरकार स्थापण्यासाठी हा एक जादूई आकडा आहे. झामुमो-कॉंग्रेस-आरजेडी (राष्ट्रीय जनता दल) पूर्णपणे आघाडीवर असून, भाजप २९ जागांवर आघाडीवर आहे. मुख्यमंत्री रघुबर दास स्वत: आपल्या मतदारसंघ जमशेदपूर पूर्व येथून साडेचार हजाराहून अधिक मतांनी पिछाडीवर आहेत.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ८१ जागांच्या झारखंड विधानसभेत झामुमो-कॉंग्रेस-आरजेडी युती आघाडीवर आहे. हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वात झामुमो २४ कॉंग्रेस १४ आणि आरजेडी ५ जागांवर आघाडीवर आहे. युती जिंकल्यास हेमंत सोरेन मुख्यमंत्री होऊ शकतात. कॉंग्रेसच्या मुख्यालयात कार्यकर्ते मिठाईचे वाटप करीत आहेत.
झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांनी सोमवारी सकाळी सांगितले की, राज्यात राज्यात भाजप सत्तेवर येईल. सुरवरतीच्या आकड्यावर अंदाज लावणे चुकीचे आहे. पत्रकारांशी बोलताना दास म्हणाले, “मला खात्री आहे की आम्ही जिंकणार आहोत. भाजपच्या नेतृत्वात पुन्हा सरकार स्थापन होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.”
झारखंडच्या विजयामुळे नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि कलम ३७० मुळे भाजपला नाकारले असल्याचे बोलले जात आहे.
कॉंग्रेसचे सचिव प्रणव झा म्हणाले, “कलम ३७० सीएए आणि एनआरसी यासारख्या राष्ट्रीय मुद्यांना सोडून नागरिकांनी स्थानिक प्रश्नांसाठी जनतेने मतदान केले.”
ते पुढे म्हणाले की महागाई आणि बेरोजगारीसारख्या स्थानिक विषयांवर राज्यातील जनतेने मतदान केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झाविमोने अद्याप कॉंग्रेस नेत्यांना कोणतेही आश्वासन दिले नाही, परंतु अंतिम निकाल लागल्यानंतर वाटाघाटी होतील असे बोलल्या जात आहे.
झारखंडमधील महत्त्वाच्या जागांसाठी झालेल्या लढतीत मुख्यमंत्री रघुबर दास अपक्ष उमेदवार सरयू राय जमशेदपूर पूर्व जागेवर जोरदार लढत देत आहे. मुख्यमंत्री रघुबर दास यांच्यापेक्षा अपक्ष उमेदवार सरयू राय आघाडीवर आहेत.
झारखंड विकास मोर्चाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी धनवार मतदार संघतून भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी-लेनिनिस्ट) चे राज कुमार यादव यांच्या तुलनेत १०,२५२ मतांनी पुढे आहेत.
झारखंडच्या सिल्ली मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री सुदेश कुमार महतो झारखंड मुक्ती मोर्चाच्या (झामुमो) सीमा देवी यांच्यापेक्षा ६,०३२ मताने आघाडीवर आहे.
झामुमोच्या उमेदवार सीमा देवी यांना १७,२३२मते मिळाली आहेत तर सुदेश महतो २३,२६४ मते घेऊन आघाडीवर आहेत.