नवी दिल्ली: नागरिकत्व कायद्याबाबत सोनिया गांधी म्हणाल्या की, भाजपा सरकारची धोरणे देशद्रोही आहेत. लोकांचा आवाज ऐकण्याची जबाबदारी सरकारची आहे. लोकशाहीमध्ये सरकारच्या चुकीच्या निर्णय विरोधात आवाज उठवण्याचा अधिकार आहे. लोकांचा आवाज सरकार दाबून टाकत आहे.
नागरिकता संशोधन कानून भेदभावपूर्ण है। नोटबंदी की तरह एक बार फिर एक-एक व्यक्ति को अपनी एवं अपने पूर्वजों की नागरिकता साबित करने के लिए लाइन में खड़ा होना पड़ेगा : कांग्रेस अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी #IndiaAgainstCAA pic.twitter.com/DutghemChe
— Congress (@INCIndia) December 20, 2019
देशभरातील नागरिकत्व कायद्याच्या निषेधावर सोनिया गांधी म्हणाल्या की आम्ही याचा निषेध करतो. नागरिकत्व दुरुस्ती कायदा भेदभाव करणारा कायदा आहे. त्याचबरोबर एनआरसी बाबत विचारले असता त्या म्हणाल्या नोटाबंदीप्रमाणे पुन्हा प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी रांगेत उभे रहावे लागेल. देशात अनेक ठिकाणी निदर्शक हिंसक झाले आहे.