नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने मंजूर केलेला राष्ट्रीय लोकसंख्या पट (एनपीआर) हा 2010मध्ये केलेल्या माहिती संकलनापेक्षा वेगळी आणि अधिक घातक आहे. त्याची संकल्पना आणि हेतू दोन्ही वेगळे आहेत, असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी स्पष्ट केले आहे.
भाजपा सरकारचा भयावह कार्यक्रम आहे. जर भाजपाचा हेतू प्रामाणिक असता तर त्यांनी 2010 वा आराखडा आणि स्वरूपात स्वीकारण्यास पाठींबा दिला असता. तसे सरकारने नि:संदिग्धपणे सांगितले असते, असे त्यांनी म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षाकडे भयावह आणि व्यापक कार्यक्रम आहे. त्यामुळेच काल मंजूर केलेल्या एनपीआर हा 2010मधील एनपीआरपेक्षा आरखडा आणि आशय या दोन्ही दृष्टीने वेगळा आहे, असे चिदंबरम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.